(विवेक कुलकर्णी )काळ बदलतोय…घरं मोठी होत आहेत, पण मनातील उब कमी होत चालली आहे.सुविधा वाढत आहेत, पण मूल्यांचा पाया ढासळत आहे.मुलं अधिक बुद्धिमान झाली आहेत, पण मनाची स्थिरता, संवेदनशीलता आणि आदराची जाणीव मात्र क्षीण होताना (Discipline Value)दिसते.
स्मार्टफोन हातात असला तरी आयुष्याचे खरे धडे—प्रेम, संयम, अनुशासन आणि संस्कार—हे त्यांच्या मनापर्यंत पोहोचत नाहीत. आणि यासाठी संपूर्ण दोष मुलांवर टाकण्याऐवजी, आपल्यालाच थांबून आत्मपरीक्षण करावे(Discipline Value ) लागेल.
घराची शाळा — जिथे मूल घडते
मुलांचे पहिले शिक्षक म्हणजे आई-वडील.पहिले शब्द, पहिली चाल, पहिली सवय—हे सर्व घरातच आकार घेतात.पण आज काही पालकांना मुलांना “हो” म्हणणे सोपे वाटते, आणि “नाही” म्हणण्याची भीती वाटते. नकार दिला तर ते रागावतील, आपल्यापासून दूर जातील अशी भीती मनात घर करून बसली आहे.खरं म्हणजे मुलांना पालकांपासून दूर नेणारी गोष्ट म्हणजे निर्बंध नव्हे, तर( Discipline Value)दिशाहीन स्वातंत्र्य.अति लाड मुलांना विस्कटतात, अति सवलती स्वैर करतात, आणि अति माया त्यांना मनाने कमकुवत बनवते. प्रेमातही मर्यादा असल्या तरच ते नातं टिकतं.शाळा — जिथे मुलं माणूस बनतातशिक्षक हे मुलांचे दुसरे पालक.त्यांच्या फटकारण्यात प्रेम असते, कठोरतेत भविष्यासाठीची चिंता दडलेली असते.शाळा म्हणजे फक्त अक्षरे शिकण्याची जागा नव्हे, तर वर्तन, शिस्त, मर्यादा, सामाजिक भान आणि आत्मविश्वासाची पहिली प्रयोगशाळा आहे.पण आज शिक्षकांना दटावण्याचा, चूक थांबवण्याचा अधिकार कमी होत चालला आहे.मुलांच्या चुका पाहण्यापेक्षा शिक्षकांच्या प्रयत्नांवर बोट ठेवणाऱ्यांची संख्या वाढली आहे.गुरूंचा मान कमी झाला की ज्ञानाची किंमत आपोआप कमी (Discipline Value)होते.
हरवलेले बालपण
मोबाईलची स्क्रीन खेळण्यांची जागा घेत आहे.रात्रभर जागणं, सकाळी उठण्याची अनास्था, जबाबदारीकडे दुर्लक्ष, मोठ्यांचं ऐकायला नको—हे दृश्य आता सर्वत्र सर्वसाधारण झालं आहे.जे वय मैत्री, खेळ आणि मुक्त विचारांचं आहे, ते वय स्पर्धा, फॅशन, ट्रेंड आणि सोशल मीडियाने ग्रासले आहे.प्रश्न विचारण्याऐवजी रागावणं, सल्ला स्वीकारण्याऐवजी विरोध करणं—ही नवीन पिढीची वेदनादायक(Discipline Value) वास्तविकता आहे.समाज — जो शेवटी आरसा दाखवतोपहिली चूक माफ होते,दुसरी चूक सहन होते,पण तिसरी चूक आयुष्याची वाटच बदलून टाकते.घरात शिकवली नाही ती शिस्त,जग शिकवते तेव्हा त्याची किंमत फार मोठी असते.समाज समजावतो तेव्हा उशीर झालेला असतो,कायदा शिकवतो तेव्हा वेदना झालेल्या असतात.मुलं अचानक बिघडत नाहीत;ती हळूहळू हातातून निसटत जातात…आणि कधी लक्षात येतं कीरोखण्यासाठी आपणच खूप उशीर केला.
आता जागं होण्याची वेळशि स्त म्हणजे तिरस्कार नाही.शिक्षा म्हणजे सूड नाही.कडकपणा म्हणजे क्रौर्य नाही.ही मुलांच्या भविष्यासाठीची संरक्षण कवचं (Discipline Value)आहेत.
आज आपण त्यांना मार्गदर्शन केलं,तर उद्या ते मजबूत उभे राहतील.आज त्यांना मर्यादा शिकवल्या,तर उद्या त्यांनी स्वतःचे मूल्य जपतील.आज त्यांना आदर शिकवला,तर उद्या ते खऱ्या अर्थाने माणूस बनतील.मुलांचे भविष्य आपणच(Discipline Value) घडवायचे आहे.
त्यांच्या आयुष्याची पहिली ओळ आपणच लिहायची आहे.आज आपण बदललो,तर उद्या त्यांना बदलण्याची वेळ येणारच नाही.
