अहमदाबाद (विवेक कुलकर्णी ): क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो आणि त्याचेच आणखी एक ज्वलंत उदाहरण आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात पाहायला मिळाले. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गुजरात टायटन्सला अनेक माजी क्रिकेटपटू आणि समालोचकांनी विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले होते. युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघावर सर्वांच्या नजरा होत्या. मात्र, अंतिम क्षणी पुन्हा एकदा अनुभव, संयम आणि दर्जेदार फलंदाजीचा संगम घडवत विराट कोहलीने संपूर्ण सामन्याचा चेहरामोहरा बदलला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपदावर नाव (RCB Ipl Champion 2026)कोरले.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या रंगतदार अंतिम सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सवर ५ गडी राखून विजय मिळवत इतिहास रचला. १५६ धावांचे लक्ष्य आरसीबीने अवघ्या १८ षटकांत पूर्ण केले. या विजयासह सलग दोन आयपीएल जेतेपदे पटकावणाऱ्या मोजक्या संघांमध्ये आरसीबीची गणना होऊ लागली (RCB Ipl Champion 2026)आहे.
गुजरातची निराशाजनक फलंदाजी
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा संघाला मोठा फायदा झाला. गुजरातची सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली. कर्णधार शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर यांसारखे प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने गुजरातचा डाव सुरुवातीलाच डळमळीत (RCB Ipl Champion 2026) झाला.

अंतिम सामन्याचे दडपण गुजरातच्या फलंदाजांवर स्पष्टपणे दिसून आले. संघातील एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. केवळ वॉशिंग्टन सुंदरने संयमी आणि लढाऊ अर्धशतक झळकावत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. परिणामी गुजरात टायटन्सला २० षटकांत ८ बाद १५५ धावांपर्यंतच मजल मारता आली. आरसीबीकडून रासिख सलाम दारने तीन बळी घेत प्रभावी कामगिरी केली, तर भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद (RCB Ipl Champion 2026)केले.
कोहली-अय्यरची विजयी पायाभरणी
१५६ धावांच्या तुलनेने सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली आणि वेंकटेश अय्यर यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. दोघांनी गुजरातच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण करत अवघ्या काही षटकांत सामन्याचे पारडे आरसीबीच्या बाजूने (RCB Ipl Champion 2026)झुकवले.
कोहली आणि अय्यर यांनी पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी रचत विजयाचा मजबूत पाया घातला. अय्यरने ३२ धावांची उपयुक्त खेळी केली. त्यानंतर राशिद खानने अय्यर आणि देवदत्त पडिक्कल यांना बाद करत गुजरातला पुनरागमनाची संधी निर्माण करून दिली. मात्र तोपर्यंत सामन्याची सूत्रे पूर्णपणे कोहलीच्या हाती गेली (RCB Ipl Champion 2026)होती.
विराटची ‘किंग’ खेळी
विराट कोहलीबद्दल नव्याने काय सांगावे? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असंख्य विक्रम नावावर असलेल्या या महान फलंदाजाची धावांची भूक अजूनही कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. अंतिम सामन्याच्या दबावात त्याने ज्या शांततेने आणि आक्रमकतेने फलंदाजी केली, ती पाहून चाहत्यांना त्याच्या सुवर्णकाळाची आठवण (RCB Ipl Champion 2026)झाली.
कोहलीने अवघ्या २५ चेंडूत आयपीएल कारकिर्दीतील सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याने गुजरातच्या गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. चौफेर फटकेबाजी करत त्याने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. पाटीदार, क्रुणाल पंड्या आणि टीम डेविड बाद झाल्यानंतरही त्याने संयम सोडला नाही. अखेरीस जितेश शर्मासोबत महत्त्वाची भागीदारी करत विजयावर शिक्कामोर्तब (RCB Ipl Champion 2026)केले.
नाबाद ७५ धावा; सामनावीर पुरस्कारावर मोहोर
विराट कोहली अखेरपर्यंत नाबाद राहिला. त्याने ४२ चेंडूत ७५ धावांची शानदार खेळी करत गुजरातच्या आशा संपुष्टात आणल्या. त्याच्या खेळीत ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. विजयाचा षटकारही त्याच्याच बॅटमधून आला आणि त्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियमवर आरसीबीच्या चाहत्यांचा जल्लोष उसळला. या दमदार खेळीसाठी कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात (RCB Ipl Champion 2026) आले.
आरसीबीसाठी हा केवळ आणखी एक विजय नव्हता, तर सातत्य, आत्मविश्वास आणि संघभावनेचे प्रतीक ठरलेला ऐतिहासिक क्षण होता. गेल्या हंगामात पहिले विजेतेपद जिंकणाऱ्या आरसीबीने यंदा ते यश कायम ठेवत आयपीएलमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले. आणि या संपूर्ण मोहिमेचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा ठरला तो म्हणजे – ‘किंग’ विराट कोहली.सामन्यात विराट कोहलीने नाबाद ७५ धावा करत आरसीबीला ५ गडी राखून विजय मिळवून दिला. गुजरात टायटन्स १५५/८ धावांवर रोखले गेले (RCB Ipl Champion 2026)होते.



