प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठ्यासाठी प्रशासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. शहरभर हजारो किलोमीटर लांबीचे जलवाहिन्यांचे जाळे आणि मोठ्या क्षमतेचे जलकुंभ उभारले गेले आहेत. मात्र, कागदावर मजबूत दिसणारी ही यंत्रणा प्रत्यक्षात मात्र अपुरी ठरत असून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले (PCMC Water Supply) आहे.
यंत्रणा मजबूत; अंमलबजावणीत त्रुटी
वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जातो. शुद्धीकरण केंद्रे आणि आधुनिक वितरण व्यवस्था असल्याचा दावा प्रशासन करते. तरीही अनेक सोसायट्या आणि उपनगरांमध्ये दिवसाआड किंवा अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार आहे. विशेषतः चिखली, मोशी, वाकड आणि हिंजवडी या वेगाने विकसित होणाऱ्या भागांत परिस्थिती अधिक गंभीर असून टँकरवर अवलंबित्व वाढताना दिसत आहे. जलवाहिन्या अस्तित्वात असूनही पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली(PCMC Water Supply) आहे.
गळती आणि पाणीचोरीमुळे मोठे नुकसान
शुद्धीकरण केंद्रातून बाहेर पडणारे पाणी आणि नागरिकांपर्यंत पोहोचणारे पाणी यामध्ये मोठी तफावत असल्याचे समोर येत आहे. जलवाहिन्यांमधील गळती आणि अनधिकृत नळजोडण्यांमुळे कोट्यवधी लिटर पाणी वाया जात आहे. ‘वॉटर ऑडिट’ केवळ औपचारिकतेपुरते मर्यादित राहिल्याची टीका होत आहे. तज्ज्ञांच्या मते, गळती रोखून वितरण व्यवस्था सुधारल्याशिवाय पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार (PCMC Water Supply)नाही.
टँकरवर वाढती जबाबदारी
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अनेक भागांत पाणी कपात लागू झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियमित पाणीपुरवठा न मिळाल्याने नागरिकांना खाजगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून महिन्याला हजारो रुपयांचा खर्च करावा लागत आहे. कोट्यवधींच्या पाणी प्रकल्पांचा लाभ नेमका कोणाला होतोय, असा सवाल नागरिक उपस्थित करत (PCMC Water Supply)आहेत.
तातडीने उपाययोजनांची गरज
शहरातील वाढती पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने गळती रोखणे, अनधिकृत जोडण्या थांबवणे आणि वितरण व्यवस्थेत सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, यासाठी तातडीने प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी शहरवासीयांकडून होत (PCMC Water Supply)आहे.
