चिंचवड, प्रतिनिधी —मोरया गोसावी महाराजांच्या ४६४ व्या समाधी संजीवन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाचे धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळे सोमवार, दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी देऊळमळा, श्री मोरया गोसावी समाधी मंदिर येथे अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाले. दिवसभर चाललेल्या विविध धार्मिक उपक्रमांना सुमारे १,२०० हून अधिक भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद (Morya Gosavi Samadhi) दिला.
पहाटेपासूनच मंदिर परिसरात “गणपती बाप्पा मोरया”च्या घोषणांनी प्रसन्नता पसरली होती. नितीन दैठणकर यांच्या चौघडा वादनाने दिवसाची सुरुवात झाली, तर गोंदवलेकर महाराज आरती मंडळाच्या सामूहिक आरतीने परिसर भक्तिभावाने दुमदुमला. त्यानंतर आयोजित मोरया गोसावी महाराज चरित्र पठणात भाविकांनी श्रद्धापूर्वक(Morya Gosavi Samadhi) सहभाग नोंदवला.
सकाळी ९ ते १२ या वेळेत वेदशास्त्र संपन्न चंद्रशेखर रबडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली मन्यसूक्त हवन पार पडले. सौ. भट आणि नारायण लांडगे यांनी केलेल्या श्रीसूक्त पठणामुळे परिसरात आध्यात्मिक शांततेचा( Morya Gosavi Samadhi)अनुभव लाभला.
स्व. अखिल शरद लुनावत यांच्या स्मरणार्थ निखिल लुनावत यांनी आरोग्य आणि दंत तपासणी शिबिर आयोजित केले होते, ज्याचा लाभ शंभरहून अधिक भक्तांनी (Morya Gosavi Samadhi) घेतला.
दुपारी महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला. त्यानंतर स्थानिक भजनी मंडळाने सादर केलेल्या भक्तिगीतांनी वातावरण प्रसन्न केले. संध्याकाळच्या सत्रात मानसी बडवे यांच्या भावपूर्ण कीर्तनामुळे उपस्थित श्रोत्यांमध्ये अध्यात्मिक(Morya Gosavi Samadhi)ऊर्जा संचारली.
सायंकाळी जेष्ठ पत्रकार आणि विचारवंत उदय निरगुडकर यांच्या ‘सध्याचा सामर्थ्यशाली भारत’ या विषयावरील व्याख्यानाला भाविकांची मोठी उपस्थिती लाभली. व्याख्यानापूर्वी पिंपरी-चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे मंदार महाराज देव, जितेंद्र देव आणि केशव विद्वास यांनी त्यांचा मान्यवर सत्कार (Morya Gosavi Samadhi) केला.
व्याख्यानात उदय निरगुडकर यांनी समाजातील चुकीच्या समजुती, व्यवसायावरील अविश्वास, बाहेरील गोष्टींचे अतीमूल्यांकन आणि भारतीय कर्तृत्वाकडे दुर्लक्ष होण्याबाबत स्पष्टपणे मुद्दे मांडले. जग पाहताना जागृत आणि सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक असल्याचे त्यांनी( Morya Gosavi Samadhi)सांगितले.
जनता राष्ट्राभिमानी आणि निश्चयी असेल तरच राष्ट्र महासत्ता बनते, समाजाची एकजूट राष्ट्राच्या सामर्थ्यात रूपांतरित होते, असे त्यांनी प्रतिपादन केले. ज्ञानाची साधने टिकवण्याचे महत्त्व अधोरेखित करताना भारताच्या गत ३५ वर्षांतील सॉफ्टवेअर एक्स्पोर्टने सौदी अरेबियाच्या क्रूड ऑईल एक्स्पोर्टलाही मागे टाकल्याची तथ्यपूर्ण नोंद त्यांनीMorya Gosavi Samadhi, केली.
अलेक्सा तयार करणारा वैज्ञानिक धैर्य दंड हा नाशिकचा सामान्य घरातील भारतीय असल्याचा उल्लेख करत आधुनिक भारतातील उत्कर्ष, नवोन्मेष आणि स्वाभिमानाची जाण त्यांनी श्रोत्यांना करून दिली.
आयोजकांच्या मते, अशा धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमुळे पिढ्यांमधील संवाद वाढतो, परंपरेचे संवर्धन होते आणि समाजात सकारात्मक ऊर्जा व आध्यात्मिक मूल्यांची जपणूक घडते. चिंचवडगावातील ही प्रेरणादायी परंपरा आगामी काळातही असाच उत्साह आणि भक्तिभाव जपत पुढे जावी, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली.
