बाणेर, पुणे : साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. सुरेखा कटारिया यांना Suryadatta Group of Institutes तर्फे राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. बाणेर येथील बंटारा भवन येथे संस्थेच्या २८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित भव्य समारंभात हा सन्मान करण्यात (Suryadatta Award)आला.
हा पुरस्कार भारताचे माजी सरन्यायाधीश उदय उमेश Lalit यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास संजय Chordiya, सौ. सुषमा चोरडिया, परमपूज्य आचार्य चंदनजी महाराज साहेब तसेच अभिनेते अशोक सराफ यांची उपस्थिती(Suryadatta Award) होती.
प्रा. कटारिया यांनी साहित्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातही मोलाचे कार्य केले आहे. त्या अखिल भारतीय जैन परिषदेच्या महिला विभागाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा तसेच अखिल भारतीय कटारिया फाउंडेशनच्या राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी श्री आनंद मंगल एज्युकेशन ट्रस्टची स्थापना करून महिला व बालविकासासाठी कार्य सुरू ठेवले (Suryadatta Award)आहे.
आजपर्यंत त्यांनी १५ अखिल भारतीय महिला साहित्य व कला परिषदा आयोजित केल्या असून अनेक पुस्तके लेखन केले आहे. त्यांचे कार्यक्रम दूरदर्शन व आकाशवाणीवर प्रसारित झाले (Suryadatta Award)आहेत.
हा सन्मान वैयक्तिक गौरव नसून सामाजिक जबाबदारी अधिक दृढ करण्यासाठी प्रेरणादायी असल्याची भावना प्रा. कटारिया यांनी व्यक्त (Suryadatta Award)केली
