प्रतिनिधी :केंद्र सरकारच्या कथित कामगारविरोधी आणि शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ विविध केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी गुरुवार, १२ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. सुमारे ३० कोटींहून अधिक कामगार या संपात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, बँकिंग, सार्वजनिक वाहतूक आणि सरकारी सेवांवर त्याचा परिणाम होऊ (Bharat Band)शकतो.
संपाचे मुख्य कारण काय?
कामगार संघटनांचा प्रमुख आक्षेप केंद्र सरकारच्या नव्या चार ‘लेबर कोड्स’ (कामगार संहिता) विरोधात आहे. या कायद्यांमुळे कामगारांची नोकरीची सुरक्षितता कमी होऊन नियोक्त्यांचे वर्चस्व वाढेल, असा संघटनांचा आरोप आहे.याशिवाय, संयुक्त किसान मोर्चाने (SKM) भारत-अमेरिका व्यापार कराराला विरोध दर्शवत बंदला पाठिंबा दिला आहे. बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी ‘आठवड्यात पाच दिवस काम’ ही मागणी प्रलंबित असल्याने संपात सक्रिय सहभाग जाहीर केला (Bharat Band)आहे.
बँका, शाळा आणि कार्यालयांची स्थिती
बँक सेवा :सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्यास शाखांमधील कामकाज, चेक क्लिअरन्स आणि रोख व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, डिजिटल बँकिंग, यूपीआय (UPI) आणि एटीएम (ATM) सेवा सुरू राहण्याची शक्यता (Bharat Band)आहे.
शाळा आणि महाविद्यालये :
देशभरात अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. स्थानिक परिस्थितीनुसार काही राज्यांमध्ये (विशेषतः केरळ आणि ओडिशा) प्रशासन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेऊ शकते. महाराष्ट्रात अद्याप सुट्टीबाबत अधिकृत घोषणा झालेली (Bharat Band) नाही.
सरकारी कार्यालये :
काही कर्मचारी संघटनांनी संपाचा इशारा दिल्याने सरकारी कार्यालयांमध्ये उपस्थिती कमी राहण्याची शक्यता (Bharat Band)आहे.
कोणत्या सेवा सुरू राहणार?
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवा संपातून वगळण्यात आल्या आहेत. रुग्णालये, रुग्णवाहिका, औषधांची दुकाने, विमानतळ सेवा आणि अग्निशमन दल यांचे कामकाज सुरू राहील. खाजगी कार्यालये आणि आयटी कंपन्यांचे कामकाजही सुरू राहण्याची शक्यता आहे; मात्र नागरिकांनी प्रवासाचे नियोजन आगाऊ करावे, असे आवाहन करण्यात आले (Bharat Band)आहे.
वाहतुकीवर परिणाम?
एसटी आणि स्थानिक बस संघटनांनी बंदला पाठिंबा दिल्यास सार्वजनिक वाहतूक सेवांमध्ये अडथळे येऊ शकतात. रेल्वे सेवा नियमित सुरू राहण्याची अपेक्षा असली तरी, काही ठिकाणी आंदोलकांकडून ‘चक्का जाम’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.एकूणच, ‘भारत बंद’चा विविध सेवांवर मिश्र परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांनी आवश्यक कामांचे नियोजन पूर्वीच करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले (Bharat Band) आहे.
