प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. शहराच्या विकासासाठी पारदर्शक आणि वेगवान प्रशासनाचे आश्वासन देत सत्तेत आलेल्या भाजपच्याच नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार टीका केल्याने सभागृहातील वातावरण तणावपूर्ण बनले. वाढता गोंधळ लक्षात घेता अखेर सभा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात (PCMC meeting) आला.
महापालिकेतील विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या कथित घोटाळ्यांवरून आणि प्रशासकीय दिरंगाईवरून नगरसेवकांनी संतप्त भूमिका घेतली. निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र प्रत्यक्षात कारभारात पारदर्शकतेचा अभाव असून अनेक निर्णयांमध्ये विलंब होत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. “प्रशासनाने अर्थसंकल्पाचा बोजवारा उडवला आहे,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त(PCMC meeting) केली.
सभेदरम्यान नगरसेवकांनी काही ठोस मागण्या मांडल्या. शहरातील मोठे बांधकाम प्रकल्प तातडीने थांबवावेत, सल्लागारांवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च कमी करावा आणि पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी यांसारख्या मूलभूत समस्यांवर त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. “नागरिकांना नियमित पाणी मिळत नाही, पण सल्लागारांवर कोट्यवधींची उधळपट्टी सुरू आहे,” असा आरोपही सदस्यांनी(PCMC meeting) केला.
भाजपमधील अंतर्गत मतभेद आणि प्रशासनाविरोधातील तीव्र निषेधामुळे सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली. महापौरांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र नगरसेवक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने कामकाज पुढे सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे अखेर सभा तहकूब करण्यात(PCMC meeting) आली.
