(विवेक कुलकर्णी):मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आयपीएल इतिहासातील आपल्या सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत शानदार विजय मिळवला. १९व्या मोसमातील ४७व्या सामन्यात मुंबईने ४ मे रोजी ६ विकेट्सने लखनौचा पराभव केला. या मोसमात २०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची ही १२वी वेळ (Mumbai Indians win) ठरली.
लखनौने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ५ बाद २२८ धावा केल्या आणि मुंबईसमोर २२९ धावांचे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करताना मुंबईने १८.४ षटकांत ४ विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. हा विजय मुंबईचा वानखेडे स्टेडियमवरील दुसरा आणि एकूण तिसरा विजय (Mumbai Indians win)ठरला.
रोहित-रायनची दमदार सुरुवात
लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन या सलामी जोडीने भक्कम सुरुवात करून दिली. दोघांनी पॉवरप्लेमध्ये ७१ धावा जोडत आक्रमक फलंदाजी केली. या जोडीने ६५ चेंडूत १४३ धावांची शतकी भागीदारी करत विजयाचा मजबूत पाया(Mumbai Indians win) रचला.
रायन रिकेल्टनने ३२ चेंडूत ८ षटकार आणि ६ चौकारांच्या जोरावर ८३ धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर रोहित शर्मानेही आक्रमक खेळ करत ४४ चेंडूत ७ षटकार आणि ६ चौकारांसह ८४ धावा (Mumbai Indians win) केल्या.
मधल्या फळीचे अपयश, तरीही विजय
तिलक वर्मा (११) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (१२) यांना मोठी खेळी करता आली नाही. मात्र नमन धीर (नाबाद २३) आणि विल जॅक्स (नाबाद १०) यांनी संयमी फलंदाजी करत मुंबईला विजयापर्यंत (Mumbai Indians win) नेले.

लखनौकडून मनीमरण सिंहने २ विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद शमी आणि मोहसिन खान यांनी प्रत्येकी १ विकेट (Mumbai Indians win) मिळवली.
पूरनची झुंजार खेळी
यापूर्वी लखनौसाठी निकोलस पूरनने ६३ धावांची आक्रमक खेळी केली. मिचेल मार्शने ४४, हिंमत सिंगने नाबाद ४० आणि एडन मार्करमने नाबाद ३१ धावा जोडत संघाला २२८ धावांपर्यंत (Mumbai Indians win) पोहोचवले.
मुंबईकडून कॉर्बिन बॉशने एका षटकात २ विकेट्स घेतल्या. तसेच अल्लाह गजनफर, विल जॅक्स आणि रघु शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट (Mumbai Indians win) घेतली.
एकूणच, रोहित-रायनच्या दमदार सलामीमुळे आणि शेवटच्या षटकांतील संयमी फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने अवघड वाटणारे लक्ष्य सहज पार करत ऐतिहासिक विजय (Mumbai Indians win) नोंदवला.
