निगडी (विवेक कुलकर्णी ) : “मैत्री हीच जगातील सर्वश्रेष्ठ संपत्ती,” असे म्हटले जाते. महाभारत मधील श्रीकृष्ण-सुदामा, श्रीकृष्ण-अर्जुन तसेच कर्ण-दुर्योधन यांच्या मैत्रीची उदाहरणे आजही प्रेरणा देतात. अशीच निरपेक्ष, निरागस आणि सच्ची मैत्री निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय च्या पालकांमध्ये पाहायला (Eco friendly Dhulwad) मिळाली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ओळखले जाणारे हे विद्यालय केवळ मुलांनाच नव्हे, तर पालकांनाही विविध उपक्रमांतून घडवण्याचे कार्य सातत्याने करत आहे. कला, क्रीडा, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचे संस्कार देणाऱ्या या शाळेतील “क्रीडा शिक्षक पालक महोत्सव” हा उपक्रम पालकांना एकत्र आणणारा दुवा ठरला (Eco friendly Dhulwad)आहे.
दररोज सकाळी व्हॉलीबॉल व व्यायामाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या पालकांमध्ये सुरुवातीला केवळ ओळख होती; पण हळूहळू ती घट्ट मैत्रीत परिवर्तित झाली. या मैत्रीचे रूपांतर एका सामाजिक जाणीवेत झाले आणि काही वर्षांपूर्वी त्यांनी प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक ‘धुळवड’ साजरी करण्याचा संकल्प (Eco friendly Dhulwad) केला.
यावर्षीही त्यांनी तो संकल्प उत्साहाने पाळला. रासायनिक रंगांना पूर्णपणे फाटा देत फुलांपासून, हळद, गुलाल यांसारख्या नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले रंग वापरण्यात आले. त्वचेचे व आरोग्याचे नुकसान टाळणे, पाण्याचा अपव्यय रोखणे आणि ध्वनी-वायू प्रदूषण टाळणे या तिन्ही बाबींवर विशेष भर देण्यात (Eco friendly Dhulwad) आला.
धुळवडीच्या निमित्ताने त्यांनी मुलांसमोरही आदर्श निर्माण केला. “सण साजरा करताना निसर्गाची काळजी घेणे हीच खरी संस्कृती” हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला. तसेच प्लास्टिकचा वापर टाळणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि सणानंतर साफसफाईची जबाबदारी स्वतः घेणे यासारख्या कृतींमधून सामाजिक बांधिलकीही (Eco friendly Dhulwad) जपली.
या अभिनव उपक्रमात संतोष दळवी, धनंजय तेली, प्रशांत मातेरे, प्रशांत पोवार, महेश राजपूत, गणेश तरस, राहुल चौधरी, संतोष काळोखे, रवींद्र हल्लंहल्ली, विकास पाटील, अभिजित जोशी, प्रशांत मोरे, विवेक कुलकर्णी, कपिल धर्माधिकारी, मुकुंद लोटके, रवी धाबे, संदीप टकले, राम सातपुते संपत खाडे, शहाजी बारणे, अमोल पुरीगोसावी, सहदेव म्हस्के आदी पालक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले (Eco friendly Dhulwad) होते.
धुळवड साजरी केल्यानंतर ही मित्रमंडळी देहू येथे एकत्र जमली. तेथे मिसळचा आस्वाद घेत आनंददायी गप्पा रंगल्या. मात्र हा केवळ खाण्यापिण्याचा कार्यक्रम नव्हता; तर एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे, मत्सर, ईर्षा, काम, क्रोध यांसारख्या नकारात्मक भावनांचीच खरी ‘धुळवड’ करण्याचे आणि समाजात सकारात्मकतेचा संदेश देत राहण्याचे त्यांनी वचन (Eco friendly Dhulwad) दिले.
या उपक्रमातून धुळवडीचे खरे महत्त्व अधोरेखित झाले—रंगांच्या उधळणीतही माणुसकीचे रंग अधिक ठळक असावेत, आनंद साजरा करताना पर्यावरणाची काळजी घ्यावी आणि मैत्रीच्या बंधातून समाजात आदर्श नागरिकत्वाची जाणीव (Eco friendly Dhulwad) रुजवावी.
प्रदूषणमुक्त धुळवड साजरी करून ज्ञान प्रबोधिनीच्या पालकांनी केवळ एक सण साजरा केला नाही, तर पर्यावरणसंवर्धन, सामाजिक एकोपा आणि मैत्रीचा संदेश देणारा एक प्रेरणादायी आदर्श समाजासमोर ठेवला(Eco friendly Dhulwad) आहे.
