New Traffic Rules:नवे वाहतूक नियम लागू; वर्षभरात ५ वेळा नियम मोडल्यास वाहन परवाना थेट रद्द
राज्यात नवे वाहतूक नियम लागू. एका वर्षात पाच वेळा हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे किंवा सिग्नल तोडल्यास वाहन परवाना थेट रद्द होणार. १ जानेवारी २०२६ पासून अंमलबजावणी.
या नव्या नियमांमुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक झाले आहे. किरकोळ वाटणारे उल्लंघनही वारंवार केल्यास थेट वाहन परवाना गमावण्याची वेळ येऊ शकते, असा स्पष्ट इशारा परिवहन विभागाने दिला आहे.