पुणे/नागपूर, दि. ८ —समाजवादी विचारसरणी, मानवतावादी प्रेरणा आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी आजीवन झटणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक महान समाजहितैषी नेता गमावला आहे. हमाल, माथाडी, रिक्षाचालक, फेरीवाले, कागद-काच वेचणारे, बांधकाम कामगार अशा असंघटित मजुरांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे हे संघर्षयोद्धा (Baba Adhav)आज अनंतात विलीन झाले.
पुणे शहराचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी डॉ. आढाव यांना श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले की, “बाबा आढाव यांचे पुण्यासाठीचे योगदान अविस्मरणीय आहे. समाजवादी नेता, मानवतावादी विचारवंत आणि असंघटित मजुरांच्या हक्कांचे कट्टर रक्षणकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. माथाडी आणि हातगाडी कामगार कल्याण मंडळ प्रणाली उभारण्यात त्यांचे निर्णायक नेतृत्व राहिले. पुण्यातील शेकडो कामगारांना ओळखपत्र, वेतन संरचना आणि सामाजिक सुरक्षा मिळवून देण्याचा मार्ग त्यांनी मोकळा केला. त्यांच्या जाण्याने पुणेकरांची अपरिमित(Baba Adhav) हानी झाली आहे.”
मोहोळ यांनी सांगितले की, नगरसेवक, महापौर आणि सार्वजनिक जीवनातील अन्य जबाबदाऱ्या सांभाळताना विविध सामाजिक विषयांवर त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेतले असून, पुण्याचा खासदार म्हणून मी त्यांना (Baba Adhav)भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपुरातून व्यक्त केलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे, “समाजकारणातील निस्वार्थी वृत्ती, तळमळ आणि अतुलनीय प्रामाणिकतेचे प्रतीक असलेले बाबा आढाव यांचे निधन हे अत्यंत दुःखद आहे. श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी अहोरात्र लढणारा महान( Baba Adhav)संघर्षयोद्धा हरपला.”
पुढे अजित पवार म्हणाले, “हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, कागद-काचा वेचणाऱ्यांची संघटना अशा विविध संघटनांद्वारे लाखो कष्टकऱ्यांच्या जीवनात बदल घडवण्याचे कार्य त्यांनी केले. ‘एक गाव एक पाणवठा’ ही सामाजिक समता निर्माण करणारी चळवळ उभी करत समाजातील तळातील घटकाला न्याय मिळवून देणे, हा त्यांचा आजीवन ध्यास होता. सत्यशोधक चळवळीचा विचार ते कृतीतून जगले. संघर्षमय आयुष्य जगत त्यांनी समाजवादाची मूर्त( Baba Adhav) प्रतिमा उभी केली.”
अजित पवार यांनी पुढे नमूद केले की, “त्यांचा आशावाद, परखड विचार, निस्वार्थी वृत्ती आणि जनतेशी असलेली नाळ हे महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचे मोठे बळ होते. त्यांच्या जाण्याने प्रगत, विचारशील चळवळीचे अपरिमित नुकसान झाले असून महाराष्ट्राने समाजसेवेचा महान( Baba Adhav)तपस्वी गमावला आहे.”
डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने महाराष्ट्रातील असंघटित मजूर, सामाजिक न्याय, श्रमिक संघटना आणि मानवतावादी चळवळींच्या क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याची परंपरा आजही लाखो श्रमिकांच्या हक्कांसाठी( Baba Adhav)लढण्याची प्रेरणा देत राहील.
बाबा आढावांचे पार्थिव उद्या सकाळी 10 वाजता हमाल भवन मार्केटयार्ड येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सायंकाळी 4 ते 5 च्या सुमारास अंत्यसंस्कार (Baba Adhav)करण्यात येतील.

