(विवेक कुलकर्णी )मतदानानंतर राजकारणाला विराम, मैत्रीला सन्मान-प्रभाग १५ मध्ये प्रगल्भ लोकशाहीचा प्रेरणादायी (Democracy Example) क्षण**
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिकृतरीत्या पूर्णविराम दिल्यानंतर प्रभाग क्रमांक १५ मध्ये एक अत्यंत सकारात्मक, दिलासा देणारा आणि लोकशाही मूल्यांना उजाळा देणारा क्षण पाहायला मिळाला. गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचाराच्या रणधुमाळीत एकमेकांपेक्षा आपणच अधिक सक्षम आहोत, हे मतदारांपर्यंत पोहोचवणारे सर्वच उमेदवार मतदान संपताच एकत्र आले आणि एकमेकांच्या गळ्यात हात टाकून मैत्रीचा धर्म जपत असल्याचे दृश्य निर्माण (Democracy Example) क्षण**झाले.
राजकीय मतभेद, पक्षीय भूमिका आणि प्रचारातील तीव्रता या सगळ्यांवर मात करत उमेदवारांनी दाखवलेली ही सलोख्याची भूमिका पाहून प्राधिकरण परिसरातील नागरिकांना मनापासून आनंद झाला. “निवडणूक येतात-जातात, पण समाजात शांतता, सुरक्षितता आणि परस्पर सन्मान टिकून राहणे अधिक महत्त्वाचे आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक सुजाण मतदारांनी व्यक्त(Democracy Example) क्षण** केली.
या प्रसंगी भाजपाचे राजू मिसाळ, अमित गावडे, युवा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश शिंदे यांच्यासह भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. राजकीय स्पर्धक असूनही एकत्र उभे राहून हास्यविनोद करत संवाद साधताना दिसणारे हे नेते अनेक तरुणांसाठी आदर्श ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त (Democracy Example) क्षण**केली.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, “राजकारण त्याच्या जागी, मैत्री आपल्या जागी,” असे सांगत निगडी येथील सुप्रसिद्ध ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे माजी विद्यार्थी असलेले अनुप मोरे, अमित गावडे आणि निलेश शिंदे यांनी आपल्या वागणुकीतून प्रगल्भतेचे दर्शन घडवले. शिक्षणातून मिळालेले संस्कार, संवादातून दिसणारी समजूतदारपणा आणि लोकशाही मूल्यांवरील निष्ठा या साऱ्यांचे प्रत्यंतर या एका(Democracy Example) क्षण** क्षणात आले.
या सौहार्दपूर्ण वातावरणामुळे प्रभाग क्रमांक १५ हा केवळ राजकीयदृष्ट्या नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही सक्षम आणि सुरक्षित असल्याची भावना प्राधिकरणवासीयांमध्ये अधिक दृढ झाली आहे. निवडणूक संपल्यानंतरही कटुता न ठेवता एकमेकांशी सलोख्याने वागता येते, हा सकारात्मक संदेश या नेत्यांनी संपूर्ण शहराला (Democracy Example) क्षण**दिला आहे.
आजच्या काळात राजकारणाकडे संशयाने पाहिले जाते, तेव्हा अशा प्रसंगांमुळे लोकशाहीवरील विश्वास अधिक बळकट होतो. सत्ता, विजय किंवा पराभव यापलीकडे जाऊन लोकसेवा, माणुसकी आणि सामाजिक ऐक्य महत्त्वाचे असते, हे अधोरेखित करत प्रभाग १५ मधील या नेत्यांनी खऱ्या अर्थाने लोकशाहीचे जिवंत आणि प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले(Democracy Example) क्षण** आहे.
