निगडी–पिंपरी परिसरात सुरू असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे रस्त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. विशेषतः भक्ती शक्ती उड्डाणपूलाखालील श्रीकृष्ण मंदिर ते अंकुश चौक या मार्गावर गेल्या सहा महिन्यांपासून मोठ्या खड्ड्यांची समस्या कायम असून हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. काही दिवसांपूर्वी एका दुचाकीस्वाराचा याच ठिकाणी खड्ड्यात अडकल्याने गंभीर अपघात झाला आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट(Nigdi Pothole Accident) उसळली.
माझं पिंपरी चिंचवड
Pune-93Lakh Fraud:निलंबित पोलीस उपनिरीक्षकासह तिघांकडून ९३ लाखांचा फसवणुकीचा पर्दाफाश
पुणे _भोसरी पोलीस ठाण्यात निलंबित पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी आणि त्यांचे दोन साथीदार यांच्याविरोधात तब्बल ९३ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रहाटणी येथील संतोष तरटे (वय ४३) यांनी १२ नोव्हेंबर २०२५ रोजी दाखल केलेल्या तक्रारीवरून ही (Pune-93Lakh Fraud)कारवाई करण्यात आली.
तक्रारीनुसार, २०२३ मध्ये चिंतामणी यांनी तरटे यांना आकर्षक परताव्याचे गोड बोल घालून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. २० महिन्यांत गुंतवणूक दुप्पट करण्याचे आश्वासन देत तरटे यांच्याकडून १८ लाख रुपये घेतले. मात्र दिलेल्या मुदतीनंतरही केवळ १५ लाख ४० हजार रुपये परत केले गेले असून २० लाख ६० हजार रुपये परत न केल्याने फसवणूक उघड(Pune-93Lakh Fraud) झाली.
पोलीस तपासात आणखी गंभीर बाब समोर आली. चिंतामणी यांनी अशाच पद्धतीने आणखी सहा जणांकडून गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे गोळा केल्याचे स्पष्ट झाले. साक्षीदारांच्या जबाबांतून एकूण ९३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. यात आनंद पिंगळे (४० लाख), बिस्मिल्ला शेख (१० लाख), तसेच शांताराम भोंडवे, गणेश खारगे, शीतल पाटील आणि बापूसाहेब खेंगरे (प्रत्येकी ५ लाख) यांचा समावेश आहे. या सर्वांना कधी ४ टक्के व्याज, तर कधी गुंतवणूक दुप्पट करण्याचे (Pune-93Lakh Fraud)आमिष दाखवले गेले.
या प्रकरणी निलंबित पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी व्यतिरिक्त गोरक्ष मेड (रिक्षाचालक, सांगवी) आणि संदीप अहिर (रिअल इस्टेट एजंट, भोसरी) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४), ३३६(२), ३३८, ३३६(३) व ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तिघेही सध्या फरार असून त्यांच्या अटकेसाठी शोध मोहीम सुरू(Pune-93Lakh Fraud )आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, फसवणुकीचा बळी ठरलेल्यांची संख्या आणखी वाढू शकते आणि रक्कमही अधिक असल्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास(Pune-93Lakh Fraud) सुरू आहे.

Talawade Election Controversy:तळवडे प्रभाग १२ : राष्ट्रवादीचा खोटा आरोप फोल; मतदार यादीतील त्रुटीवर भाजपची वस्तुस्थिती स्पष्ट
प्रतिनिधी:आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळवडे प्रभाग क्रमांक १२ मध्ये मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पसरवलेला दिशाभूल करणारा कथानक भारतीय जनता पक्षाच्या सतर्क भूमिकेमुळे पूर्णपणे कोसळला आहे. सत्यस्थिती स्पष्ट होताच विरोधकांचा प्रचार कच्च्या धाग्यावर उभा (Talawade Election Controversyअसल्याचे समोर आले.
प्रभाग क्र. १२ मधील यादी भाग क्रमांक ७ हा निवडणूक आयोगाच्या तांत्रिक त्रुटीमुळे चुकीने प्रभाग क्र. १ मध्ये जोडला गेला होता. तळवड्यातील मतदार याद्यांमध्ये झालेल्या या विसंगतीबाबत सर्वात प्रथम आयोगाचे लक्ष वेधणारे प्रतिनिधी म्हणजे माजी नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर. संपूर्ण शहरात मतदार याद्यांमध्ये अव्यवस्था झालेल्या असताना, हा प्रकारदेखील फक्त एक प्रशासकीय दोष असल्याची माहिती उपलब्ध असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न (Talawade Election Controversyकेला.
त्यांनी असा आरोप केला की, “ही चूक आयोगाची नसून भाजपने अधिकाऱ्यांशी संगनमत करून माझे मताधिक्य कमी करण्यासाठी कट रचला आहे.” यादी भाग ७ मध्ये त्यांचे स्वतःचे नाव असल्याने त्यांनी मोठ्या सहानुभूतीची लाट निर्माण करण्यासाठी (Talawade Election Controversy भावनिक सूर लावला.
मात्र वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. भाजपच्या माजी नगरसेविका अरुणाताई भालेकर यांच्या कुटुंबीयांची नावे त्रुटीमुळे प्रभाग ११ मध्ये गेली आहेत. तसेच शांताराम भालेकर यांच्या स्वतःच्या परिवारातील नावे यादी भाग क्रमांक ७ मध्येच आढळून आली आहेत. त्याचप्रमाणे भाजपच्या कोषाध्यक्षा आणि इच्छुक उमेदवार अस्मिता भालेकर यांच्या पती अनिल भालेकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची नावेही याच चुकिच्या यादीत आहेत. त्यामुळे भाजपवर केलेले सर्व आरोप निराधार आणि वास्तवाच्या विरोधात असल्याचे स्पष्ट (Talawade Election Controversy झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ त्यांच्या राजकीय सोयीचा मुद्दा म्हणून यादी भाग क्रमांक ७ (१२६१ मते) प्रकाशात आणला. परंतु खरी परिस्थिती अशी की त्रिवेणीनगरमधील यादी क्रमांक ११४, ११६, ११७, ११८ यांसह एकूण २२०० पेक्षा अधिक मतदार प्रशासकीय अव्यवस्थेमुळे प्रभाग ११ मध्ये टाकले गेले (Talawade Election Controversy आहेत.
या घोळानंतर भाजपने मतदारांना भ्रमित न करता जबाबदारीने कार्य केले. घराघरात जाऊन नागरिकांना योग्य माहिती देणे आणि हरकती नोंदवून घेण्याचा उपक्रम माजी नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली (Talawade Election Controversy राबवण्यात आला.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता राखण्यासाठी भाजप नेहमीच सक्रिय राहील, असा ठाम संदेश प्रभाग क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांना निवेदनाद्वारे देत पक्षाने आपली बांधिलकी स्पष्ट केली (Talawade Election Controversy)आहे.
Shankar Jagtap MLA initiatives:पिंपरी चिंचवड: हिंजवडी आयटी पार्क वाहतूक कोंडीसाठी सेवा रस्ते विकासाला वेग – आमदार शंकर जगताप
प्रतिनिधी:हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने रस्ते विकासाची कामे मोठ्या वेगाने सुरू झाली आहेत. पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या मुंबई–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाकड, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, रावेत आणि किवळे परिसरातील महत्त्वाच्या सेवा रस्त्यांच्या कामांसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या स्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता. या पाठपुराव्याला यश मिळत 321 कोटींच्या सेवा रस्त्यांच्या कामाला केंद्रीय मंजुरी मिळाली (Shankar Jagtap MLA initiatives )आहे.
या मंजुरीनंतर आमदार शंकर जगताप यांनी प्रलंबित कामांना गती देत सेवा रस्त्यांचे डांबरीकरण युद्धपातळीवर सुरू केले आहे. पुनावळे आणि ताथवडे परिसरातील डांबरीकरण पूर्ण झाले असून काम थेट भुमकर चौकापर्यंत पोहोचले आहे. आमदार स्वतः नियमितपणे कामांची पाहणी करत आहेत. या सुसज्ज सेवा रस्त्यांमुळे आयटी कर्मचाऱ्यांना तसेच स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी (Shankar Jagtap MLA initiatives )व्यक्त केला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका सीमेत असलेल्या या सेवा रस्त्यांची जबाबदारी मॉर्थ, राज्य शासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत असल्याने महापालिकेला थेट काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून तसेच एनएचएआयच्या प्रकल्प संचालक संजय कदम, तांत्रिक व्यवस्थापक अंकित यादव, कार्यकारी अभियंता सुभाष घंटे आणि समन्वयक विनोद पाटील यांच्यासोबत सातत्याने समन्वय ठेवून हे काम मार्गी लावण्यात आले (Shankar Jagtap MLA initiatives )आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील सेवा रस्त्यांचे डांबरीकरण जलद गतीने सुरू आहे. पवना नदी ते पुनावळे अंडरपास आणि तेथून ताथवडे अंडरपासपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. पुढील टप्प्यात हे काम भूमकर चौकापर्यंत पूर्ण (Shankar Jagtap MLA initiatives)होणार आहे.
हिंजवडी आयटी पार्ककडे ये-जा करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. पुनावळे, ताथवडे, वाकड, रावेत आणि किवळे या परिसरातून अंदाजे 9.7 किमीचा सेवा रस्ता विकसित होत असून त्याचबरोबर महापालिकेच्या हद्दीतील 12 मीटर रुंद डीपी रस्त्याचे कामही एनएचएआयने हाती घेतले आहे. वाढत्या रहदारीचा ताण कमी करण्यासाठी या दोन्ही कामांना वेग देण्यात आला (Shankar Jagtap MLA initiatives )आहे.
ताथवडे, पुनावळे, रावेत आणि वाकड परिसर झपाट्याने विकसित होत असून आयटी कंपन्या आणि मोठ्या निवासी प्रकल्पांमुळे येथे लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे या भागातील सबवे, सर्व्हिस रोड आणि महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुसज्ज करणे (Shankar Jagtap MLA initiatives )अत्यावश्यक झाले होते.
या सर्व कामांसाठी पुढील 50 वर्षांचा विचार करून नियोजन करण्यात आल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. वाहतूक कोंडीमुक्त, सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी उपाययोजना अंतिम टप्प्यात (Shankar Jagtap MLA initiatives ) आहेत.
ताथवडे, पुनावळे, रावेत, वाकड परिसराची देखील झपाट्याने वाढ झाली आहे. या परिसरात अनेक आयटी कंपन्या व मोठ्या रहिवासी सोसायटी आहेत. त्यातच हा परिसर हिंजवडी आयटी पार्कला लागून असल्याने नागरिक या परिसरात वास्तव्यास पसंती देत आहेत. येथे नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना पुनावळे, ताथवडे, वाकड येथील सब वे, मुंबई बेंगलोर हायवे, लगत असणारा सर्व्हिस रस्ता सुसज्ज आणि वेगवान करून देण्यासाठी प्राधान्याने काम केले जात आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करत या कामांना मार्गी लावले आहे. परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी उपाययोजना अंतिम टप्प्यात आहेत. पुढील 50 वर्षाचे “व्हिजन” या कामांसाठी देण्यात आले आहे.
– शंकर जगताप : आमदार, पिंपरी चिंचवड भाजप.
Khed Liquor Raid:पुणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; १ लाख १४ हजारांचा बनावट दारू साठा जप्त
प्रतिनिधी – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक ३ ने कारवाई करत १ लाख १४ हजार ६२५ रुपयांचा बनावट मद्यसाठा जप्त केला आहे.मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, खेड तालुक्यातील नाणेकरवाडी (मुत्केवाडी) येथे सुरू असलेल्या अवैध मद्यविक्री अड्ड्यावर २५ नोव्हेंबर रोजी छापा टाकण्यात आला. या कारवाईत पावर लाईन पंच या देशी दारूच्या १८० मिली आणि ९० मिली क्षमतेच्या ६४४ बनावट सीलबंद बाटल्या, तसेच ७१ विदेशी बनावट सीलबंद बाटल्या आणि बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा सर्व मिळून १ लाख १४ हजार ६२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त (Khed Liquor Raid) करण्यात आला.
या प्रकरणी अहमदसाब पठाण आणि हरीष ब्रिजेशकुमार चंद्रा यांना अटक करून त्यांना मे. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, खेड यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावून त्यांना येरवडा कारागृहात पाठविण्यात (Khed Liquor Raid)आले.
कारवाईदरम्यान भरारी पथक क्रमांक ३ चे निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक वाय. एम. चव्हाण, पी. ए. ठाकरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. डी. साठे, तसेच जवान अमर कांबळे, अनिल दांगट, गिरीश माने, जगन्नाथ चव्हाण, जयदास दाते आणि वाहनचालक शरद हांडगर यांनी सहभाग (Khed Liquor Raid)घेतला.
महाराष्ट्रात प्रतिबंधित, बनावट व गावठी हातभट्टी दारू निर्मिती-विक्रीमुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याने, अशा प्रकारची माहिती मिळाल्यास त्वरित राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी (Khed Liquor Raid)सांगितले.
SA Clean Sweep:दक्षिण आफ्रिकेची भारतावर दणदणीत सरशी — 65 वर्षांतील सर्वात मोठा कसोटी पराभव; मालिकेत 2–0 असा निर्विवाद विजय
(विवेक कुलकर्णी) टी–20 विश्वविजेतेपद आणि आयपीएलच्या चमकदार रंगमंचामुळे भारतीय संघातील तरुण खेळाडूंना कसोटी क्रिकेटचे निकष अजूनही जड जात असल्याचे या मालिकेत प्रकर्षाने जाणवले. भारताचा घरच्या मैदानावरील अभेद्य दुर्ग असा जो जुना समज होता, त्याला दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या मालिकेत 2–0 अशी सरळ आणि निर्भेळ सरशी साधत जोरदार धक्का दिला आहे. या पराभवामुळे भारताचा कसोटी विश्वचषकाच्या अंकतालिकेत पाचव्या स्थानावर (SA Clean Sweep) घसरण झाली.
विशाल लक्ष्याचा पाठलाग आणि भारतीय फलंदाजीचा संपूर्ण कोसळलेला पाया
दुसऱ्या डावात 500 हून अधिक धावांचे आव्हान भारतासमोर उभे राहिले. पहिल्या दिवसाअखेरीसच सलामीवीरांना गमावून बसल्यानंतरही भारतीय प्रेक्षकांनी आशेची काडी पकडून ठेवली होती. परंतु ही आशा भारतीय फलंदाजांच्या अति घाईघाईतल्या, असंयमी आणि तांत्रिक दृष्ट्या त्रुटीपूर्ण खेळामुळे लवकरच धुळीस (SA Clean Sweep) मिळाली.
दुसऱ्या डावात भारत केवळ 140 धावांवर गारद झाला आणि आफ्रिकेने 408 धावांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवून भारतीय संघ मायदेशीही असुरक्षित ठरू शकतो, हे ठळकपणे दाखवून (SA Clean Sweep) दिले.
सायमन हार्परची कारकिर्दीतली सर्वोत्तम गोलंदाजी
या सामन्याचा निर्णायक चेहरा ठरला तो दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर सायमन हार्पर. त्याने 6 गडी बाद करत आपल्या कारकीर्दीतली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. त्याच्या चेंडूंच्या उंच उसळी, वेगातील सतत बदल आणि अचूक लाईन–लेंथमुळे भारतीय फलंदाज सातत्याने (SA Clean Sweep) गोंधळात पडले.
जडेजा आणि साई सुदर्शनचा अल्पसा निर्धार
संपूर्ण संघ निराशाजनक कामगिरीत गढला असताना जडेजाने काही प्रमाणात झुंज दिली, आणि साई सुदर्शनने कसोटी तंत्र, संयम आणि स्थिरता काय असते याची झलक दाखवली. मात्र या दोन प्रयत्नांशिवाय उर्वरित फलंदाजी पाय रोवण्याच्या क्षमतेपासून खूपच दूर असल्याचे प्रकर्षाने जाणवले. पंत, राहुल आणि जैस्वाल यांनी अपेक्षाभंग (SA Clean Sweep) केला.
घरच्या मैदानावरील 65 वर्षांतील सर्वात मोठा धक्का
भारतीय संघाच्या कसोटी इतिहासात हा घरच्या मैदानावर झालेला सर्वात मोठा धावांनी झालेला पराभव ठरला आहे. या निकालाने भारतीय क्रिकेट व्यवस्थापनासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे केले (SA Clean Sweep) आहेत.
—
मालिकेतील लक्षवेधी मुद्दे
1) आफ्रिकेची नियोजनबद्ध आणि अचूक गोलंदाजी
भारतीय फलंदाजांची कमजोरी ओळखून आफ्रिकेने शॉर्ट बॉल, स्लोअर बॉल आणि लेग–स्टंप ट्रॅप यांचा संतुलित वापर केला. प्रत्येक फलंदाजाला वेगळ्या रणनीतीने अडकवून सातत्याने दडपण निर्माण करण्यात ते यशस्वी (SA Clean Sweep) ठरले.
2) मधली फळी पूर्णपणे निष्प्रभ
भारताची पारंपरिक ताकद असलेली मधली फळी संपूर्ण मालिकेत निष्प्रभ ठरली. एकाही खेळाडूने अर्धशतकसुद्धा ओलांडले नाही. कसोटी क्रिकेटमधील संयम आणि धैर्य या दोन्ही गुणांची ही उणीव ठळकपणे समोर (SA Clean Sweep) आली.
3) तरुण पिढीतील कसोटी तंत्राची कमतरता
वेगवान क्रिकेटच्या सवयीमुळे तरुण खेळाडू दीर्घ सत्र टिकवणे, गोलंदाजांना मात देण्यासाठी परिस्थितीनुसार बदल करणे आणि संयमाने धावा जमवणे या कसोटीतील मूलभूत गोष्टींमध्ये मागे पडताना (SA Clean Sweep) दिसले.
4) गील आणि गंभीर यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह
नवीन प्रशिक्षक मंडळींच्या निर्णयांवरही चर्चा सुरू झाली आहे. संघ निवड, खेळपट्टीची समज, तयारीची दिशा आणि खेळाडूंच्या भूमिकांबाबत सातत्य जाणवले नाही, असा आरोप (SA Clean Sweep) अनेकांनी केला.
5) कसोटी क्रिकेटचे धडे पुन्हा शिकण्याची आवश्यकता
भारतीय क्रिकेटला पुन्हा एकदा मूलभूत तत्त्वांकडे वळण्याची गरज आहे. आक्रमक टी–20 शैली सर्वच फॉर्मॅटवर लागू होत नाही. संयम, दीर्घकाळ टिकून राहण्याची मानसिकता आणि तांत्रिक परिपक्वता पुन्हा आत्मसात करण्याची वेळ (SA Clean Sweep) आली आहे.
शेवटचा विचार
हा पराभव हा केवळ आकड्यांचा धक्का नसून भारतीय संघाने स्वतःकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे याची ठळक जाणीव करून देणारा आहे. कसोटी क्रिकेटची प्रतिष्ठा राखायची असेल तर तयारी, दृष्टीकोन आणि पद्धती यामध्ये मोठे बदल करणे (SA Clean Sweep)अनिवार्य झाले आहे.

Voter List Objections:पिंपरी–चिंचवड मतदार यादीतील त्रुटींवर भाजपचे निवेदन | 2025
प्रतिनिधी:पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2025 साठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीतील मोठ्या प्रमाणावरील त्रुटी, विसंगती आणि नागरिकांकडून वाढत्या तक्रारींचा गंभीर पद्धतीने घेत पिंपरी–चिंचवड भाजपने आज राज्य निवडणूक आयोगाकडे औपचारिक निवेदन सादर केले. शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी संपूर्ण शहराच्या वतीने हे निवेदन देत, मतदार यादीतील सर्व गोंधळ तात्काळ दूर करण्याची मागणी (Voter List Objections) केली.
निवेदनात काटे यांनी नमूद केले की, प्रारूप यादीमध्ये अनेक मतदारांची नावे वगळली जाणे, चुकीच्या प्रभागात स्थलांतर होणे, दुबार नोंदी, पत्त्यातील चुका तसेच यादी पाहण्यासाठी प्रभावी डिजिटल सुविधा नसणे—या सर्व कारणांमुळे शहरात मोठा संभ्रम (Voter List Objections) निर्माण झाला आहे.
“मतदानाचा हक्क हा लोकशाहीचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने अशा गंभीर त्रुटींवर तातडीने कार्यवाही करणे अत्यंत आवश्यक आहे,” असेही त्यांनी निदर्शनास आणून (Voter List Objections) दिले.
याच अनुषंगाने, नागरिकांना योग्य संधी मिळावी म्हणून हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत किमान 10 दिवसांनी वाढवावी, अशी मागणी काटे यांनी आयोगाकडे केली आहे. तसेच पिंपरी–चिंचवडमधील नागरिकांना सोयीस्कर व्हावे म्हणून विशेष हेल्पडेस्क, ऑनलाइन शोध सुविधा आणि सहाय्य केंद्र तत्काळ सुरू करण्याचीही विनंती करण्यात (Voter List Objections) आली.
“अचूक मतदार यादी ही निवडणूक प्रक्रियेची भक्कम पायाभरणी असते. चुकीची, अपूर्ण किंवा गोंधळाची यादी नागरिकांशी अन्याय करणारी ठरते. त्यामुळे पारदर्शकता आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी आयोगाने तातडीने पावले उचलली पाहिजेत,” असे शहराध्यक्षांनी (Voter List Objections) स्पष्ट केले.
शहरातील विविध भागांतून येणाऱ्या असंख्य तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन महत्त्वाचे ठरत असून आगामी निवडणूक प्रक्रियेच्या शुचिते आणि विश्वासार्हतेबाबत आयोगाची भूमिका कोणती असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले (Voter List Objections) आहे.
Constitution Day PCMC:पिंपरी चिंचवड : संविधान दिन व महात्मा फुले स्मृतीदिनानिमित्त तीन दिवसीय कार्यक्रम
पिंपरी | संविधान दिन तसेच क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने २६ ते २८ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसीय प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भिमसृष्टी, पिंपरी येथील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ हे सर्व कार्यक्रम पार(Constitution Day PCMC ) पडणार आहेत.
२६ नोव्हेंबर – प्रबोधनात्मक गीत गायन
कार्यक्रमाची सुरुवात बुधवार, दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर, मुंबई यांच्या प्रबोधनात्मक गीतांच्या कार्यक्रमाने होणार(Constitution Day PCMC ) आहे.
या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत – अशोक गायकवाड आणि स्वप्नील पवार.
2७ नोव्हेंबर – विविध प्रबोधनपर कार्यक्रमांची मालिका
१) दुपारी ३.३० वाजता – प्रबोधनात्मक कार्यक्रम
सादरकर्ते : संतोष जोंधळे आणि सहकारी
२) सायं. ५.०० वाजता – प्रबोधनपर कार्यक्रम : जागर संविधानाचा
सादरकर्ते : चंद्रकांत शिंदे, रेश्मा सोनवणे, राधा खुडे, अजय क्षीरसागर व सहकारी
३) सायं. ७.०० वाजता – क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिन गीत(Constitution Day PCMC ) कार्यक्रम
सादरकर्ते : राहुल शिंदे
४) सायं. ७.३० वाजता – जागर क्रांतिसूर्याचा : प्रबोधनपर कार्यक्रम
सादरकर्ते : शिरीष पवार व सहकारी
२८ नोव्हेंबर – महात्मा फुले यांच्या कार्याचा जागर
सायं. ४.३० वाजता – महात्मा फुले स्मृतिदिन व्याख्यान
व्याख्यानाचा विषय
“महात्मा फुले यांचे शैक्षणिक धोरण आणि सामाजिक क्रांती”
व्याख्याते
डॉ. सुखदेव थोरात – ज्येष्ठ अर्थतज्ञ व माजी अध्यक्ष(Constitution Day PCMC ), विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), भारत सरकार
सर्व कार्यक्रमांचे (Constitution Day PCMC )ठिकाण :
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ (भिमसृष्टी), पिंपरी, पुणे – १८.
या तीन दिवसीय कार्यक्रमांद्वारे महापालिका संविधान, सामाजिक जागरूकता, शैक्षणिक विचार आणि सामाजिक परिवर्तनातील महात्मा फुले यांच्या योगदानाची जनजागृती करत आहे. प्रबोधनात्मक गीत, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना प्रेरणा देण्याचे उद्दिष्ट यामागे (Constitution Day PCMC ) आहे.
Celebrity Privacy Issue.:धर्मेंद्र : हिंदी चित्रपटसृष्टीतील मर्दानी प्रतिमेचा शेवटचा प्रवास आणि पुन्हा एकदा उभा राहिलेला संवेदनशील प्रश्न
हिंदी चित्रपटसृष्टीत ही-मॅन म्हणून ओळखले जाणारे, अस्सल मर्दानी व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक ठरलेले धर्मेंद्र यांचे काल निधन झाले. त्यांच्या जाण्याची बातमी दिग्गजांपासून सर्वसामान्यांपर्यंत दुःखाची लाट निर्माण करणारी ठरली. पण यापेक्षा अधिक चर्चेत राहिला तो त्यांचा अंत्यविधी. देओल कुटुंबाने अत्यंत गोपनीयतेत, कोणालाही न सांगता संस्कार पार पाडले आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला जाणीवपूर्वक लांब ठेवले. या निर्णयामुळे पुन्हा एकदा तोच प्रश्न अनेकांना पडला की प्रसिद्ध व्यक्ती झाल्यावर माणसाचे खासगी जीवन इतके का (Celebrity Privacy Issue) संपुष्टात येते?
धर्मेंद्र यांचा प्रवास हा साधेपणातून सुपरस्टारकडे नेणाऱ्या कहाणीचा उत्तम नमुना आहे. साध्या शेतकरी परिवारातून आलेल्या धर्मेंद्र यांच्याकडे सुरुवातीला ना कोणाचे पाठबळ होते, ना मोठी ओळख. मात्र त्यांच्या मेहनतीने, अथक जिद्दीने, खडतर संघर्षाने आणि मर्दानी व्यक्तिमत्त्वाने त्यांनी मुंबईच्या रुपेरी पडद्यावर अधिराज्य मिळवले. अभिनयशैली, संवादफेक, देखणे रूप आणि प्रचंड चार्म यांच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी (Celebrity Privacy Issue) स्थान निर्माण केले.
त्यांच्या पडद्यावरील प्रतिमेपेक्षा पडद्याबाहेरचे व्यक्तिमत्त्व अधिक माणुसकीपूर्ण होते. अनेकांना दिलदारपणे मदत करणे, नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणे, आणि सर्व स्तरातील लोकांशी मनमोकळेपणाने वागणे – ह्या गुणांमुळे धर्मेंद्र फक्त सुपरस्टार नसून इंडस्ट्रीतील सर्वांचे आपले म्हणून ओळखले जात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार होते. विवाहित असताना हेमामालिनी यांच्याशी विवाहबद्ध झाले, काही काळ ते लपवले गेले, त्याबाबत वाद झाले; परंतु त्यांच्या चाहत्यांनी शेवटी हा निर्णयही स्वीकारला. कारण धर्मेंद्र यांचे आयुष्य हे नाटक नव्हते, ते (Celebrity Privacy Issue)मनापासून जगलेले जीवन होते.
वय वाढत असताना सिनेमातील उपस्थिती कमी झाली, पण त्यांनी चाहत्यांशी संपर्क कायम ठेवला. फॉर्महाऊसवरून शेअर केलेले त्यांच्या साध्या जीवनातील व्हिडिओ लोकांना अतिशय भावले. काही वेळा ते चिंतन करताना, तर कधी शेतात फिरताना दिसत. त्यांचे सौम्य हास्य, शांत बोलणे आणि साधेपणा (Celebrity Privacy Issue)या व्हिडिओंतून स्पष्ट दिसत असे.
अलीकडे प्रकृती ढासळल्याने त्यांची तब्येत चिंताजनक झाली. याच काळात काही इलेक्ट्रॉनिक चॅनेल्सनी त्यांच्या आजाराविषयी अर्धवट माहिती, अंदाज आणि अफवा पसरवल्या. कुटुंबाच्या भावनांचा विचार न करता दिल्या जाणाऱ्या अशा बातम्या देओल परिवाराला मनस्ताप देणाऱ्या ठरल्या. प्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनातले खास क्षणही खाजगी नसतात, त्यातही संकटकाळात संवेदनशीलतेने वागण्याची जबाबदारी मीडिया विसरतो, अशी भावना पुन्हा (Celebrity Privacy Issue)एकदा चर्चेत आली.
कुटुंबाने याच कारणामुळे धर्मेंद्र यांच्या अंत्यविधीसंदर्भात कुणालाही माहिती दिली नाही. चाहत्यांना यात सामील होता आले नाही, ही खंत अनेकांच्या मनात कायम राहील. ज्यांनी आयुष्यभर लोकांचे मनोरंजन केले, त्यांना शेवटचा निरोप देण्याची संधी चाहत्यांना मिळाली नाही, ही वेदना मोठी(Celebrity Privacy Issue) आहे.
मीडियाचे काम नक्कीच जनतेपर्यंत माहिती पोहोचवणे आहे. पण ही माहिती सत्य, पडताळलेली आणि संवेदनशीलतेची जाणीव ठेवून दिली जाणे तितकेच आवश्यक आहे. अफवांच्या नावाखाली प्रसिद्धीची स्पर्धा वाढवताना समाजातील भावनांना तडा जातो, हे वारंवार सिद्ध झाले आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाने हा मुद्दा पुन्हा(Celebrity Privacy Issue) अधोरेखित झाला.
पद्मभूषण धर्मेंद्र यांचे जीवन हे मेहनत, माणुसकी, नात्यांवरील प्रेम आणि साधेपणा या सर्वांचे सुंदर मिश्रण होते. त्यांच्या जाण्याने एक युग संपले, पण त्यांची उबदार व्यक्तिमत्त्वाची आठवण कायम राहील. पडद्यावरील त्यांची ताकदीची प्रतिमा आणि पडद्यामागचा मृदू स्वभाव – या दोन्हींचा गोलाकार संगम असलेली ही व्यक्ती आता इतिहासाचा भाग झाली (Celebrity Privacy Issue)आहे.
धर्मेंद्र यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.
विवेक दिगंबरराव कुलकर्णी
