पिंपरी (प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ किवळे-रावेत-विकासनगर प्रभाग क्रमांक १६ मध्ये आयोजित प्रचार सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (ता. ९) मार्गदर्शन केले. या सभेमुळे शिवसेनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश(Eknath Shinde Rally) संचारला आहे.
या सभेत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बालासाहेब ओव्हाळे, रेश्मा कातळे, ऐश्वर्या तरस आणि निलेश तरस यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. किवळे-रावेत-विकासनगर परिसरातील मुठाई चौकात ही प्रचार सभा आयोजित करण्यात आली (Eknath Shinde Rally )होती.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमेद इरफान सय्यद, जिल्हाप्रमुख सुरेखा उबाळे, उपजिल्हाप्रमुख राजेश खांबे, पश्चिम महाराष्ट्र युवा सेना प्रमुख विश्वजित बारणे, जिल्हा संपर्क प्रमुख बालासाहेब वालकर, शहरप्रमुख निलेश तरस, जिल्हा संघटिका शीतल भोंडे, महानगरप्रमुख राजेश वालकर आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित(Eknath Shinde Rally) होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमध्ये भगव्याचा वाढता प्रभाव स्पष्टपणे दिसत आहे. या भूमीत शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत राहणार नाही, तर सत्तेचा निर्णायक घटक ठरेल. हिंदुत्वसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा घेऊन शिवसेना जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेली आहे. शिवसेनेच्या विचारांशी तडजोड होणार(Eknath Shinde Rally) नाही.”
