प्रतिनिधी:कात्रज बायपासवरील नवले पुलाजवळ वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक विभागाने अखेर कठोर निर्णय घेतला आहे. २५ नोव्हेंबर (मंगळवार) पासून या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवीन वेगमर्यादा लागू करण्यात येणार ( Pune Traffic News) आहे.
अलिकडेच नवले पुलावर ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिल्याने ८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले होते. या दुर्घटनेने नागरिक आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर वाहतूक विभागाने अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय ( Pune Traffic News) घेतला.
पुणे–मुंबई–बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या कात्रज बायपास मार्गावर भुमकर ब्रिज ते नवले ब्रिजच्या शेवटपर्यंत संपूर्ण पट्ट्यात सर्व प्रकारच्या वाहनांसाठी कमाल वेगमर्यादा 30 किमी प्रतितास इतकी निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा फक्त नवले पुलाच्या तीव्र उतारापुरती होती. मात्र सततचे अपघात, वाहनांची गर्दी आणि धोकादायक उतार लक्षात घेऊन आता पूर्ण मार्गावर ही नवी मर्यादा लागू करण्यात ( Pune Traffic News) आली आहे.
वाहतूक विभागाच्या मते, नवीन वेगमर्यादेची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास कात्रज बायपासवरील अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास ( Pune Traffic News) मदत होईल.
