प्रतिनिधी :पिंपरी–चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या आणि मर्यादित जलस्रोत लक्षात घेता सध्या दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नाही, असे मत भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, शहरातील नागरिकांना दररोज पाणी देण्याऐवजी दर दुसऱ्या दिवशी योग्य दाबात पाणी दिल्यास सर्व भागांतील नागरिकांना समान प्रमाणात पाणी मिळू (PCMC Water Supply)शकते.
काटे यांनी स्पष्ट केले की, आंद्रा आणि भामा-आसखेड धरणांमधून अतिरिक्त पाणी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र सध्या शहराची लोकसंख्या सुमारे ३५ लाखांच्या आसपास असून भविष्यात ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याची मागणी सातत्याने वाढत (PCMC Water Supply)आहे.
यामुळे पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असून, उपलब्ध पाण्याचा समतोल वापर व्हावा यासाठी दररोजऐवजी पर्यायी दिवस पाणीपुरवठा अधिक व्यवहार्य ठरेल, असेही त्यांनी नमूद ((PCMC Water Supply)केले
