प्रतिनिधी :पुण्यातील नवले पुलावरील सततच्या भीषण अपघातांमुळे संतापलेल्या नागरिकांनी शनिवारी अनोखे आणि लक्षवेधी आंदोलन केले. मुंबई–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील या धोकादायक पुलावर नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा प्रतीकात्मक ‘दशक्रिया विधी’ करून निषेध व्यक्त केला. वारंवार होणारे अपघात थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप करत नागरिकांनी या आंदोलनातून प्रशासनाला जागे करण्याचा (Navale Protest) प्रयत्न केला.
नवले पुलाचा परिसर गेल्या अनेक वर्षांपासून अपघातांसाठी कुप्रसिद्ध ठरला आहे. अलीकडेच झालेल्या एका भीषण अपघातात आठ निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता. त्याच ठिकाणी आज परिसरातील रहिवासी आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत शांत, परंतु ठाम असा निषेध नोंदवला. दशक्रिया या प्रतीकात्मक विधीच्या माध्यमातून प्रशासनाने केलेल्या निष्क्रियतेचा, अनुत्तरीत राहिलेल्या मागण्यांचा आणि दुर्लक्षित सुरक्षाविषयक मुद्द्यांचा कठोर विरोध त्यांनी (Navale Protest)मांडला.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार नवीन कात्रज बोगद्याच्या दिशेने असलेला तीव्र उतार, रस्त्याच्या रचनेतील त्रुटी, योग्य वेगमर्यादेची अंमलबजावणी न होणे, वारंवार ट्रक आणि टेम्पोचे ब्रेक फेल होणे या समस्यांवर अनेक वर्षे चर्चा झाल्या. परंतु रंबलर पट्टे, वेगमर्यादा बोर्ड किंवा साईनज लावण्यासारखे फक्त तात्पुरते उपायच करण्यात आले. त्यामुळे अपघातांची मालिका थांबली नसल्याचा आणि प्रशासनाने गंभीर पावले उचलली नसल्याचा आरोप (Navale Protest)नागरिकांनी केला.
या आंदोलनाचे नेतृत्व भूपेंद्र मोरे यांनी केले. त्यांनी प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षावर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांच्या मते, हे केवळ अपघात नसून सततच्या निष्काळजीपणातून घडणारे टाळता येण्यासारखे मृत्यू आहेत. त्यामुळे प्रशासनाने जबाबदारी स्वीकारून तातडीने स्थायी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी (Navale Protest)त्यांनी केली.
नवले पुलावरील मृत्यूचा सापळा बनलेल्या या अपघातप्रवण ठिकाणावर अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, अद्यापही ठोस आणि दीर्घकालीन कामांची सुरुवात न झाल्याने नागरिकांच्या रोषाला उधाण आले आहे. आजच्या प्रतीकात्मक दशक्रियेतून हा संताप स्पष्टपणे दिसून (Navale Protest) आला.
स्थानिकांचा दावा आहे की हा निषेध एक दिवसाचा कार्यक्रम नसून पुढील काळातही प्रशासनाला सतत जागे करण्यासाठी अशा आंदोलनांना वेग दिला जाईल. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन तातडीच्या पावल्या उचलल्या नाहीत, तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा इशाराही देण्यात (Navale Protest)आला आहे.
