पिंपरी (दि. ०५ मे २०२६) : “लिखित स्वरूपात कागदावर अवतरते ते साहित्य होय. साहित्याचे विविध प्रकार असले तरी श्रमिकांच्या साहित्यनिर्मितीत वास्तवाची जिवंत अनुभूती मिळते,” असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी केले. ते निगडी प्राधिकरण येथील कवयित्री शांता शेळके सभागृहात सोमवार (दि. ०४ मे २०२६) रोजी आयोजित ‘साहित्यिक कामगार सन्मान’ सोहळ्यात बोलत (Yogesh Soman)होते.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे होते. व्यासपीठावर प्रभाकर ओव्हाळ (पुणे जिल्हा प्रतिनिधी), राजन लाखे (अध्यक्ष, मसाप पिंपरी-चिंचवड), डॉ. रजनी शेठ (उपाध्यक्षा) यांची प्रमुख उपस्थिती (Yogesh Soman) होती.
यावेळी दत्तू ठोकळे, प्रताप सोनवणे, परमानंद मौर्य, सुरेश ताडे, रामचंद्र प्रधान, जयवंत पवार, प्रवीण जाधव आणि पांडुरंग सुतार या ‘श्रमिक साहित्यिकांचा’ योगेश सोमण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच ‘दहा शब्द मराठी विश्व साहित्य संमेलन’ यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल संजय सिंगलवार यांचा विशेष गौरव करण्यात आला. उद्योजक सुनील पंडित आणि मकरंद बापट यांचाही प्रातिनिधिक सत्कार करण्यात(Yogesh Soman) आला.
कार्यक्रमात पुनरुत्थान समरसता गुरुकुलममधील अफ्रिदा अन्सारी आणि श्रावणी भिसे या विद्यार्थिनींनी आवडलेल्या पुस्तकांचे रसग्रहण सादर केले. तसेच रेखा येळंबकर, तरुजा भोसले, शीला टाकळकर, अनघा पाठक आणि नागेश गव्हाड यांनी श्रमिकांचे भावविश्व व्यक्त करणाऱ्या स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची दाद (Yogesh Soman) मिळवली.
योगेश सोमण पुढे म्हणाले, “महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे नव्या साहित्यिकांची पिढी घडेल. वाचनातून मराठी भाषेची समृद्धी जाणवते आणि खऱ्या वाचकाला वाचनाचे व्यसन कधीही सोडावेसे वाटत (Yogesh Soman) नाही.”
दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. राजन लाखे यांनी प्रास्ताविकातून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या इतिहासाचा साहित्याशी असलेला संबंध स्पष्ट केला. कार्यक्रमात गायक सुनील भावसार (महाराष्ट्र गीत), रवींद्र कुलकर्णी (‘श्रमिकहो घ्या इथे विश्रांती’) आणि निखिल वैद्य (‘मराठी पाऊल पडते पुढे’) यांनी सादर केलेल्या गीतांनी वातावरण भारावून (Yogesh Soman) गेले.
अध्यक्षीय मनोगतात पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले, “समाजात नीतिमूल्ये रुजविण्याचे कार्य साहित्यिक करत असतात. पोटाची भूक भागली तरी सांस्कृतिक भूक कायम राहते आणि अशा वेळी साहित्यिक उपक्रमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची (Yogesh Soman) ठरते.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जगताप यांनी केले. किरण जोशी, जयश्री श्रीखंडे, किरण लाखे, आनंद यंकरस, नीलिमा फाटक, इला पवार, माधुरी मंगरूळकर, गीता सुतार, मीना शिंदे, हेमांगी बोंडे, प्रतिमा काळे, रेवती साळुंखे, दिलीप मराठे आणि अशोक होनराव यांनी संयोजनात सहकार्य (Yogesh Soman) केले.
