पिंपरी (दि. १ मे २०२६) : “भक्तीसोबतच माणसाला कर्मप्रवण करणारी ज्ञानेश्वरी ही केवळ धार्मिक ग्रंथ नसून एक जीवनप्रणाली आहे,” असे प्रतिपादन डॉ. भावार्थ देखणे यांनी केले. चिंचवडगाव येथील चापेकर स्मारक उद्यानात गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेच्या अंतिम सत्रात ते बोलत (Jijau Vyakhyanmala) होते.
गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय व्याख्यानमालेचा समारोप ‘एक तरी ओवी अनुभवावी!’ या विषयावरील व्याख्यानाने झाला. या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक दत्ता चासकर, नगरसेविका अपर्णा डोके, सामाजिक कार्यकर्त्या गीतल गोलांडे, संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, कार्याध्यक्ष ॲड. विपुल नेवाळे, सुहास पोफळे आदी मान्यवर उपस्थित (Jijau Vyakhyanmala)होते.
प्रास्ताविकात राजाभाऊ गोलांडे यांनी जिजाऊ व्याख्यानमालेच्या ३६ वर्षांच्या परंपरेचा आढावा घेत, या माध्यमातून महाराष्ट्रातील नामवंत व्याख्यात्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केल्याचे सांगितले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करताना अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त(Jijau Vyakhyanmala) केली.

डॉ. देखणे यांनी आपल्या व्याख्यानात संत ज्ञानेश्वरांच्या कार्याचा गौरव करत, “संतपरंपरेमुळेच महाराष्ट्राची ओळख घडली. ज्ञानेश्वर माउलींनी भागवत धर्म आणि सामाजिक समतेचा पाया रचला. ‘जे जे भेटिजे भूत, ते ते मानिजे भगवंत’ या विचारातून त्यांनी समाजाला एकात्मतेचा संदेश दिला,” असे सांगितले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथांमधून कर्म, विकर्म आणि अकर्म यांचे तत्त्व समजते आणि निरपेक्ष भावनेने कर्म केल्यासच खरा आनंद (Jijau Vyakhyanmala) मिळतो.
व्याख्यानापूर्वी डॉ. भावार्थ देखणे यांना ‘चिंतामणी पुरस्कार’, डॉ. चंद्रकुमार देशमुख यांना ‘क्रांतिवीर चापेकर पुरस्कार’ आणि लता टाकळकर यांना ‘जिजाऊ पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात केशव शंखनाद पथकाच्या मंगल शंखनादाने (Jijau Vyakhyanmala) झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले, तर महेश गावडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या सदस्यांनी सहकार्य(Jijau Vyakhyanmala) केले.

