पिंपरी | प्रतिनिधी ‘:निसर्ग हाच सर्वशक्तिमान निर्माता असून अतिप्राचीन काळापासून मानव निसर्गात सातत्याने हस्तक्षेप करत आहे,’ असे प्रतिपादन सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी केले. रयत शिक्षण संस्था संचलित महात्मा फुले महाविद्यालय, संभाजीनगर, चिंचवड येथे आयोजित सात दिवसीय स्वयं-अर्थसहायित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषद आणि चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी (Mhaske Nature Conference) ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले होते. व्यासपीठावर डॉ. सुरेश साळुंखे (प्राचार्य, एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर), डॉ. गणेश करे पाटील (अध्यक्ष, यशकल्याणी संस्था, करमाळा), महेंद्र भारती (अध्यक्ष, बाबा भारती प्रतिष्ठान), स्वप्ना हजारे, संजय पोकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय ऑस्ट्रेलिया येथील डॉ. प्रणाली देवरे, कोल्हापूरचे प्रा. डॉ. विनोद शिंपले, संभाजीनगरचे प्रा. डॉ. चंद्रशेखर हिवरे, इनर व्हीलच्या अध्यक्षा कमलजीत कौर, प्रा. डॉ. स्नेहल कुलकर्णी, प्रा. डॉ. महेश खर्डे, अरुण जवळे आदी मान्यवर सभागृहात उपस्थित(Mhaske Nature Conference) होते.
कुलगुरू डॉ. म्हस्के पुढे म्हणाले, ‘जगात विध्वंसक प्रवृत्ती वाढत असताना विज्ञानाने विधायक आणि शाश्वत मार्ग शोधणे आवश्यक आहे. विज्ञानातील विविध शाखा एकमेकांना पूरक असून, विशेषतः सूक्ष्मजीवशास्त्राचा बहुविध क्षेत्रांत प्रभावी उपयोग करून शाश्वत विकास साधता येऊ (Mhaske Nature Conference)शकतो.’
यावेळी डॉ. गणेश करे पाटील यांनी सांगितले की, ‘७७५ शाखा आणि सुमारे साडेचार लाख विद्यार्थी असलेल्या रयत शिक्षण संस्थेतील महात्मा फुले महाविद्यालयाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांच्या माध्यमातून “बायो-फ्युजन २०२५” हा संकल्प राबविणे ही ऐतिहासिक बाब आहे. अशा परिषदांमधून विद्यार्थ्यांनी नोबेल दर्जाच्या संशोधनाकडे वाटचाल करून बौद्धिक संपदा हक्कांची नोंदणी (Mhaske Nature Conference)करावी.’
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले म्हणाले, ‘पर्यावरणरक्षण ही काळाची गरज आहे. सर्व विज्ञानशाखांचा समन्वय साधण्याच्या उद्देशानेच या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. भविष्यात महात्मा फुले महाविद्यालय संशोधनाचे केंद्रबिंदू म्हणून कार्यरत (Mhaske Nature Conference)राहील.’
समारोप सोहळ्याची सुरुवात महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन आणि एआय-संचलित दीपप्रज्वलनाने झाली. ‘बायो-फ्युजन २०२५’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या संयोजक प्रा. डॉ. संगीता अहिवळे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, पाच विद्यापीठांतील सुमारे ३५ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी परिषदेत सहभाग घेतला. १० ते १८ डिसेंबर या कालावधीत झालेल्या सात दिवसीय परिषदेत विविध शाखांअंतर्गत ‘थिंक ग्रीन, कॅल्क्युलेट क्लीन’, ‘भाषा व साहित्य विकासात भाषांतराचे योगदान’, ‘भूगोल आणि शाश्वत पर्यटन’, ‘इमर्जिंग ट्रेण्ड्स इन इंटरप्रिन्युअरशिप’, ‘भारताचे बदलते परराष्ट्र धोरण : आव्हाने आणि संधी’, ‘एआय, मानसशास्त्र, ग्रंथशास्त्र व शारीरिक शिक्षण’ आणि ‘बायो-फ्युजन २०२५’ या विषयांवर आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे झाली. यामध्ये विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण शोधनिबंध सादर(Mhaske Nature Conference) केले.
परिषद संयोजनात प्रा. डॉ. सुहास निंबाळकर, प्रा. डॉ. कामायनी सुर्वे, प्रा. डॉ. नीलकंठ डहाळे, प्रा. डॉ. सचिन चव्हाण यांनी सहकार्य केले. प्रा. ऐश्वर्या वाळुंज व प्रा. सुप्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर संजय पोकळे यांनी आभार प्रदर्शन(Mhaske Nature Conference) केले.
