प्रतिनिधी :नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. १ एप्रिल २०२६ पासून देशातील प्रमुख बँकांनी एटीएम व्यवहारांवरील शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये HDFC Bank, Punjab National Bank आणि Bandhan Bank यांसारख्या बँकांचा समावेश असून, या बदलांचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार (ATM Withdrawal Fees) आहे.
बँकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दरमहा मिळणाऱ्या मोफत एटीएम व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर आता ग्राहकांना अधिक शुल्क मोजावे लागणार आहे. विशेषतः HDFC Bank ने मर्यादेबाहेरील प्रत्येक आर्थिक व्यवहारावर आकारले जाणारे शुल्क वाढवले आहे. तसेच Punjab National Bank ने आपल्या ‘फ्री ट्रान्झॅक्शन’ धोरणात बदल करत १ एप्रिलपासून नवे दर लागू करण्याचा निर्णय घेतला (ATM Withdrawal Fees) आहे.
खाजगी क्षेत्रातील Bandhan Bank देखील सेवा शुल्कात वाढ करत असून, एटीएम व्यवहारांसोबतच चेकबुक सुविधा आणि इतर काही बँकिंग सेवांसाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. बँकांच्या म्हणण्यानुसार, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे आणि बँकिंग व्यवस्था अधिक सक्षम करणे हा या बदलामागील उद्देश (ATM Withdrawal Fees)आहे.
१ एप्रिलपासून लागू होणाऱ्या या नियमांमुळे ग्राहकांनी आपल्या आर्थिक व्यवहारांचे नियोजन करणे गरजेचे ठरणार आहे. अनावश्यक एटीएम व्यवहार टाळून, तसेच UPI किंवा नेट बँकिंगसारख्या डिजिटल पर्यायांचा वापर वाढवून अतिरिक्त शुल्क वाचवता येऊ शकते. ग्राहकांनी आपल्या बँकेकडून मिळणाऱ्या अधिकृत संदेशांद्वारे सुधारित शुल्काची माहिती करून घेण्याचे आवाहनही करण्यात आले (ATM Withdrawal Fees)आहे.
दरम्यान, Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार तसेच केंद्र सरकार डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, या शुल्कवाढीमुळे मध्यमवर्गीय आणि ग्रामीण भागातील ग्राहकांमध्ये काही प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून हे नियम देशभरात लागू होणार (ATM Withdrawal Fees)आहेत.
