सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात कार्य करण्याच्या उदात्त हेतूने, “आपणही समाजाचे काही देणे लागतो” या भावनेतून ३१ डिसेंबर २०१६ रोजी शिरूर तालुक्यातील समविचारी नोकरदार, व्यापारी, पत्रकार, समाजसेवक, शेतकरी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात एकत्र आली. “वेदनेला फुंकर माणुसकीची” या घोषवाक्याने प्रेरित होत सुमारे ६० ते ७० कार्यकर्त्यांनी नववर्षापासून समाजासाठी भरीव काम करण्याचा संकल्प केला आणि त्यातूनच ‘एकता फाउंडेशन’ या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली (Ekata Foundations )गेली.
स्थापनेनंतर एकताने सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम राबवले. तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रातील जखमी प्राण्यांना अन्नधान्य मदत, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, तसेच पोलिस दलाच्या मानसिक आरोग्यासाठी आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील सितार-पखावज जुगलबंदी यांसारखे उपक्रम विशेष ठरले. शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिरे, सेवाश्रमातील बालकांचे पालकत्व, वृक्षारोपण आणि गरजू कुटुंबांना मदत असे विविध उपक्रम सातत्याने राबवले (Ekata Foundations )गेले.
सन २०१८ पासून ‘एकता मराठी साहित्य संमेलन’ या उपक्रमाला सुरुवात झाली आणि साहित्यिक चळवळीला नवे व्यासपीठ मिळाले. लेखक आपल्या भेटीला, कविसंमेलने, परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्यभरातील साहित्यिक, कवी, विद्यार्थी आणि रसिकांना एकत्र आणण्यात यश आले. पुढील काळात हे संमेलन राज्यस्तरावर विस्तारले आणि विविध जिल्ह्यांमध्ये यशस्वीपणे पार (Ekata Foundations )पडले.
कोरोना काळातही एकता फाउंडेशनने आपले कार्य थांबवले नाही. कठीण परिस्थितीत नियमांचे पालन करत रक्तदान शिबिरे आयोजित केली. त्याचबरोबर ऑनलाइन काव्यसंमेलने, मातृदिन काव्य सप्ताह आणि विविध साहित्यिक उपक्रम राबवून साहित्याची परंपरा अखंड ठेवली. आजपर्यंत ४० हून अधिक राज्यस्तरीय ऑनलाइन काव्यसंमेलने यशस्वीपणे आयोजित करण्यात आली(Ekata Foundations ) आहेत.
एकता फाउंडेशनने केवळ साहित्यापुरते मर्यादित न राहता शिक्षण, पर्यावरण, सामाजिक जनजागृती आणि सांस्कृतिक जतन यावरही भर दिला. राज्यस्तरीय स्पर्धा, कार्यकर्ता शिबिरे, ग्रंथालय स्थापना, व्याख्याने, बालसंस्कार शिबिरे अशा विविध माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याची परंपराही निर्माण (Ekata Foundations )केली.
२०२६ पर्यंत एकता फाउंडेशनने राज्यभर आपला ठसा उमटवला असून, अनेक साहित्य संमेलने, पुरस्कार वितरण सोहळे आणि सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडले आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रवासात जात, धर्म, राजकारण यापलीकडे जाऊन एकदिलाने काम करण्याची भूमिका कायम ठेवली गेली (Ekata Foundations )आहे.
आज एकता फाउंडेशन ही केवळ संस्था नसून एक व्यापक सामाजिक-साहित्यिक चळवळ बनली आहे. “एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ” या तत्वज्ञानावर आधारित ही चळवळ समाजातील विविध घटकांना एकत्र आणत आहे. स्थानिक पातळीवरील कार्याला राज्यस्तरावर नेण्याचा आणि सामूहिक शक्ती निर्माण करण्याचा एकताचा प्रयत्न प्रेरणादायी ठरत (Ekata Foundations )आहे.
शांतीवनातील ४५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या चळवळीचा आढावा घेताना, एकतेच्या कार्याचा विस्तार आणि प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. आगामी काळातही ही चळवळ अधिक व्यापक होत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त केला जात (Ekata Foundations )आहे.
— साहित्यिक अनंत कराड
संस्थापक अध्यक्ष, एकता (Ekata Foundations )फाउंडेशन
