(गॉल, दि. १९, विवेक कुलकर्णी ): श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार अष्टपैलू कामगिरी करत यजमान श्रीलंकेचा १६५ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेत जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (WTC) अंतिम फेरीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल (Ind vs Sl Test) टाकले.
भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो युवा डावखुरा फिरकीपटू मानव सुतार. त्याने सामन्यात तब्बल १० बळी घेत श्रीलंकेच्या फलंदाजीची कंबर मोडली. पहिल्या डावात चार, तर दुसऱ्या डावात सहा बळी घेत सुतारने कसोटी क्रिकेटमध्ये आपला प्रभावी ठसा (Ind vs Sl Test)उमटवला.
त्याआधी देवदत्त पडिक्कलने पहिल्या डावात शानदार १६७ धावांची खेळी करत भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. भारताने पहिल्या डावात ४६२ धावा उभारल्या. दुसऱ्या डावात ऋषभ पंतने आक्रमक ६६, पडिक्कलने ४४ आणि के.एल. राहुलने ३५ धावांची उपयुक्त खेळी करत भारताची आघाडी आणखी भक्कम केली. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी ३७२ धावांचे आव्हान(Ind vs Sl Test) ठेवले.
या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव २०६ धावांवर आटोपला. मानव सुतारच्या फिरकीसमोर श्रीलंकेचे फलंदाज टिकू शकले नाहीत आणि भारताने तब्बल १६५ धावांनी सामना आपल्या नावे (Ind vs Sl Test) केला.

फलंदाजीत पडिक्कल, पंत आणि राहुल यांनी दाखवलेली संयमी आक्रमकता आणि गोलंदाजीत मानव सुतारच्या नेतृत्वाखालील भेदक मारा यामुळे भारताने गॉलमध्ये सर्वच आघाड्यांवर वर्चस्व गाजवले. WTC अंतिम फेरीसाठी प्रत्येक विजय महत्त्वाचा असताना श्रीलंकेविरुद्ध मिळवलेला हा विजय भारताच्या मोहिमेला निश्चितच मोठी चालना देणारा ठरला (Ind vs Sl Test) आहे.

आता मालिकेतील दुसऱ्या कसोटीतही विजय मिळवून WTC फायनलच्या शर्यतीत आपली स्थिती आणखी मजबूत करण्याचे भारतीय संघासमोर लक्ष्य (Ind vs Sl Test) असेल.
