धर्मशाळा (विवेक कुलकर्णी ):इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ मधील पहिल्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चालेंजर्स बेंगलुरू ने गतविजेत्या गुजरात टायटन्स वर तब्बल ९२ धावांनी दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत शानदार प्रवेश केला. या विजयासह आरसीबीने पाचव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारली असून सलग दुसऱ्या विजेतेपदाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले (IPL 2026 Quallifier)आहे.
धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या या लढतीकडे क्रिकेटविश्वाचे विशेष लक्ष लागले होते. कारण या सामन्यातील विजेत्या संघाला थेट अंतिम फेरीचे तिकीट मिळणार होते. मात्र, अपेक्षित चुरशीऐवजी आरसीबीने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत सामना पूर्णपणे एकतर्फी (IPL 2026 Quallifier) केला.
सामन्याच्या सुरुवातीला गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत आरसीबीच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला होता. अवघ्या नवव्या षटकात आरसीबीची अवस्था ३ बाद ९३ अशी झाली होती. त्यामुळे गुजरातने सामन्यावर मजबूत पकड घेतल्याचे चित्र दिसत (IPL 2026 Quallifier)होते.
मात्र, कर्णधार रजत पाटीदार याने जबाबदारी स्वीकारत डाव सावरला आणि त्यानंतर आक्रमक फलंदाजी करत सामन्याचा रंगच बदलून टाकला. त्याला अनुभवी फलंदाज विराट कोहली याची महत्त्वपूर्ण साथ लाभली. कोहलीने संयमी खेळ करत डावाला स्थिरता दिली, तर पाटीदारने चौकार-षटकारांची आतषबाजी करत धावगती वाढवली. मधल्या षटकांमध्ये आरसीबीच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवत मोठी धावसंख्या (IPL 2026 Quallifier) उभारली.
प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. आरसीबीच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी अचूक लाईन-लेंथ राखत गुजरातच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळू दिले नाही. नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्याने गुजरातचा डाव कधीच सावरू शकला (IPL 2026 Quallifier) नाही.
एका बाजूने राहुल तेवतिया याने काही आकर्षक फटके खेळत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या बाजूने त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. आरसीबीच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या जोरावर गुजरातचा संपूर्ण डाव गुंडाळत ९२ धावांनी मोठा विजय (IPL 2026 Quallifier) मिळवला.
या विजयामुळे आरसीबीच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षे विजेतेपदासाठी संघर्ष करणाऱ्या संघाने गेल्या काही हंगामांत सातत्यपूर्ण कामगिरी करत स्वतःला बलाढ्य दावेदार म्हणून सिद्ध केले (IPL 2026 Quallifier) आहे.
कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघ अधिक संतुलित आणि आत्मविश्वासपूर्ण दिसत असून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये आरसीबीने उत्कृष्ट समन्वय दाखवला(IPL 2026 Quallifier) आहे.
आता अंतिम सामन्यात आरसीबीसमोर कोणता संघ उभा ठाकणार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले असून सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावण्याचे आरसीबीचे स्वप्न पूर्ण होणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली (IPL 2026 Quallifier) आहे.
